Thursday, November 26, 2015

मूल कसं शिकतं भाग -2

मूल कसं शिकतं

भाग -2

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मूल शिकत असताना आपण बारकाइने पाहिले तर वरील गोष्टींचा
अभ्यास केल्यास आपल्या असे लक्षात येते की मूल त्याचे ते ... शिकता शिकता शिकते.
त्याच्या कड़े असलेल्या अनुभवाच्या ,पूर्व ज्ञानाच्या आधारे ते विविध कृतीतुन शिकते हे आपल्या लक्षात येते.
 मूल प्रत्येक ठिकाणी शिकत असते.
शाळा, निसर्ग ,परिसर ,समाज व सहकारी यांच्याकडून खुप काही शिकत असते ...
नव्हे वरील घटकांचा परिणाम त्याच्यावर शिकत असताना होत असतो.

🔷शिकणे म्हणजे काय ?असा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर आपल्या असे लक्षात येते की शिकणे ही एक कृतीशिल प्रक्रिया आहे, कारण मूल हे कृतीतुन शिकत असतं अस बऱ्याच शिक्षण तज्ञांचे मत आहे.

🔷ज्यावेळेस मूल शिकत असत त्यावेळेस त्याच्याकड़े काही अनुभव असतात आणि त्या अनुभवाच्या जोरावर ते अधिक प्रभावी पणे शिकत असत. विविध अनुभव त्याने जन्मापासून घेतलेले असतात. फ़क्त या काळात वयाचा विचार होणे फार गरजेचे असते.

🔷 प्रत्येक शिक्षकाची अशी मानसिकता असते की माझ्या शाळेतील मूल शिकलं पाहीजे. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने त्या मुलास प्रत्यक्ष  वस्तु हाताळायला देणे गरजेचे आहे असे मला वाटते.

🔷 शिकणे आणि शिकायला शिकणे या दोन गोष्टी  वेगळ्या आहेत.कोणतीही गोष्ट  शिकायची असेल तर त्यामधे प्रत्यक्ष सहभाग असणे महत्वाचे  असतं ,कारण माणूस जेव्हा शिकत असतो तेव्हा मानवी मेंदुमधे नव्या पेशीजलिका निर्माण होत असतात .ज्या माणसाला शिकण्यासाठी उपयोगी पडतात आणि यातूनच शिकण्याची क्षमता ही विकसित होत असते.

🔷शिकणे ही प्रक्रिया व्यक्तिगत घडणारी घटना आहे. ही प्रक्रिया घडत असताना आपण फ़क्त वाचन म्हणजे शिक्षण असे न करता पुस्तका बाहेर ही भरपुर ज्ञान मिळत असते  हे तत्व स्विकारुन त्याला समाजात ही वावरु दिले पाहीजे .कारण बालक समाजात ही भरपूर काही शिकत असते.

🔷ज्यावेळेस मूल शिकत असते  त्यावेळेस भाषा हां घटक फार महत्वाचा असतो.
कारण मातृभाषेतून विविध संकल्पना मूल लवकर समजून घेते.
त्यामुळे प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण दिले गेले पाहीजे.

🔷मूल शिकत असताना विविध अडचणी त्याला येत असतात आणि येणाऱ्या अडचणी कश्या सोडवायच्या यावर ते विचार करत करत शिकत असते
म्हणजेच नविन आव्हाने बलकाला शिकन्यास प्रवृत्त करत असतात

🔷 शिकणे ही एक सतत चालनारी प्रक्रिया आहे .पण पालक व् समाज यांची असी मानशिकता तयार झालेली आहे की मूल शाळेत आले की लगेच त्याला आले पाहीजे त्याने लगेच सर्व क्षमता प्राप्त केल्या पाहिजेत परन्तु आपन एक गोष्ठ लक्षात घेतली पाहीजे की शिकणे ही निरंतर चालनारी प्रक्रिया आहे
त्यामुळे बालकाला शिकण्यासाठी पुरेसा कालावधी दिला पाहीजे

🔷ज्यावेळेस बालक शिकत असते त्यावेळेस इतरांची नकळत मदत घेत असते
वायगोटस्की म्हणतो-
मुलांच्या शिक्षणाला प्रौढांची मदत होत असते
🔷ज्यावेळेस बालक शिकत असते त्यावेळेस त्याची भावनिक स्थिरता महत्वाची असते कारण भावनिक स्थिरता नसेल तर मूल नाही शिकु शकत


वरील सर्व बाबींचा शिक्षकानी बारकाइने अभ्यास केल्यास किंवा
वरील बाबी स्विकारल्यास मूल हे शिकतच

विक्रम अड़सुळ
9923715464

संयोजक

Active Teacher's Maharshtra (ATM)

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

No comments:

Post a Comment

कर्जत येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण कार्यशाळेत स्टॉल सादरीकरणाची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल